Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Sunday, August 30, 2026

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजने’चा दुसरा टप्पा ४३ हजार ६६० शेतकऱ्यांच्या खात्यात ३७४ कोटी वर्ग !


वाशिम,दि.२८ ऑगस्ट (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस मानोरा):
राज्य शासनाच्या  ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६’ अंतर्गत  या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील १७ हजार ३२७ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल १५०.०५ कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. यासह आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ४३ हजार ६६० शेतकऱ्यांच्या खात्यात ३७४.९१ कोटी रुपयांचा निधी जमा झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


राज्य शासनाने गत २ जून २०२६ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. वाशिम जिल्ह्यातील ६९४ गावांमधील सेवा सहकारी संस्था (जिल्हा मध्यवर्ती बँक) तसेच राष्ट्रीयकृत, ग्रामीण व खाजगी बँकांच्या एकूण ५४,१०२ पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

दुसऱ्या टप्प्यातील निधी  तपशील

शासनाने २४ ऑगस्ट २०२६ रोजी जाहीर केलेल्या दुसऱ्या टप्प्यात आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना निधी वितरित करण्यात आला.

 * एकूण लाभार्थी शेतकरी: १७,३२७
   * जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक: ७,०९१ शेतकरी
   * राष्ट्रीयकृत बँका: १०,२३६ शेतकरी
 * एकूण वितरित रक्कम: १५०.०५ कोटी रुपये
   * जिल्हा मध्यवर्ती बँक: ५६.४३ कोटी रु.
   * राष्ट्रीयकृत बँका: ९३.६२ कोटी रु.

पहिल्या व दुसऱ्या टप्प्याची एकत्रित स्थिती

वाशिम जिल्ह्यात आतापर्यंत ४६,६९८ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून, त्यापैकी ४३,६६० पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात (पहिला व दुसरा टप्पा मिळून) ३७४.९१ कोटी रुपये जमा झाले आहेत. यात सेवा सहकारी संस्थांचे (जिल्हा मध्यवर्ती बँक) २५,२०५ सभासद असून त्यांच्यासाठी २००.२३ कोटी रुपये, तर राष्ट्रीयकृत बँकांचे १८,४५५ सभासद असून त्यांच्यासाठी १७४.६८ कोटी रुपयांचा समावेश आहे.

शेतकऱ्यांना आवाहन

सदर योजनेअंतर्गत अद्यापही ७,४०४ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी नोंदणी अभावी बाकी आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांची अॅग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी असणे बंधनकारक आहे.
ज्या शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण बाकी आहे, त्यांनी आपला विशिष्ट क्रमांक व आधार क्रमांक घेऊन नजीकच्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ येथे भेट द्यावी आणि लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण पूर्ण करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर आणि जिल्हा उपनिबंधक माणिकराव लटपटे यांनी  केले आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर